भावनिक बुद्धिमत्ता विषयावर उद्यापासून राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

author
0 minutes, 1 second Read
Spread the love

  विद्यार्थी दशेत प्रामुख्याने अध्यापनामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा? आणि विविध विद्याशाखांमध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा संबंध कसा येतो? या महत्त्वपूर्ण पैलूंवर भारतातील विविध राज्यांमधून येणारे तज्ज्ञ अभ्यासक आपले संशोधन लेख सादर करणार आहेत. या विषयातील नामांकित तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थितांना मार्गदर्शन करणार असून मानवी वर्तणूक आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी भावनिक बुद्धिमत्ता कशी उपयुक्त ठरू शकते यावर सविस्तर चर्चा करणार आहे.

  बदलत्या शैक्षणिक प्रवाहात आणि मानवी जीवनात भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व लक्षात घेऊन या चर्चासत्राचे आयोजन कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी दिली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *