अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

author
0 minutes, 2 seconds Read
Spread the love

    मतदार संघातील अनेक गावांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे आणि गारांमुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू, कांदा, काढणी झालेला कांदा, कलिंगड, द्राक्ष बागा या पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. काढणीला आलेला गहू भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. फळबागांचे देखील प्रचंड नुकसान झाले असून नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आधीच संकटात असताना या अवकाळी पावसाने शेतीचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. 

    अशा परिस्थितीतही महायुती शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याकरिता तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत आणि तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *