कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस धोरण निश्चित करा

author
0 minutes, 2 seconds Read
Spread the love

   राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या नैसर्गिक आपत्ती आणि बाजारपेठेतील अनिश्चित दर अशा दुहेरी संकटात सापडले आहेते. कांद्याच्या दरात झालेली घसरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब बनली असून सद्यस्थितीत कांद्याला मिळणारा भाव पाहता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे अशक्य झाले आहे.शेतकऱ्यांच्या पदरात किमान दोन पैसे पडावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने कांदा प्रश्नावर योग्य निर्णय घेणे गरजेचे असल्याने कांदा उत्पादक पट्ट्यातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करून बाजारभावातील चढ-उतार आणि निर्यात धोरण यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत शासनाने ठोस धोरण निश्चित करण्याची मागणी आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

 यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री ना.छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन, कृषीमंत्री ना. दत्तात्रय भरणे, शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री ना. नरहरी झिरवळ, पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल तसेच इतरही मतदारसंघांचे विधानसभा सदस्य आणि प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *