संस्कृत सप्ताहातून विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख

author
0 minutes, 3 seconds Read
Spread the love

      सप्ताहात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि भाषिक कौशल्यांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने पोस्टर प्रेझेंटेशन, मेहंदी, संस्कृत निबंधलेखन, ऑनलाइन प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, संस्कृत गीतगायन आणि स्तोत्रपठण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग घेतला.विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके तसेच प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. 

     ऑनलाइन प्रश्नमंजुषेत सहभागी झालेल्या प्राध्यापकांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.सांगता समारंभाच्या प्रमुख व्याख्यात्या श्रीम. अनिता माळी (पदवीधर शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोऱ्हाळे तथा संस्कृतभारती, अहिल्यानगर जनपद) यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा आणि आधुनिक काळातील उपयुक्तता यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संस्कृत भाषेतील ज्ञानाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी या भाषेशी आत्मीयतेने जोडले जावे, असे आवाहन त्यांनी केले.

      संस्कृत सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, कार्यालयीन अधीक्षक पानसरे, IQAC समन्वयक डॉ. लक्ष्मण घायवट, परीक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. संस्कृत विभागप्रमुख प्रा. मोहिनी काशिद यांनी सप्ताहाचे संयोजन केले.विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्कृत सप्ताहाला केवळ स्पर्धांचे स्वरूप न राहता संस्कृत भाषा, भारतीय संस्कृती आणि ज्ञानपरंपरेचा जागर घडविणारा उपक्रम म्हणून विशेष रंगत प्राप्त झाली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *